बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

अहाहा किती सुंदर दृश्य आहे न हे? हा आहे नागार्जुनसागरचा सुंदर आणि विस्तीर्ण जलाशय.



अरे हे काय आहे?



कुरकु-यांचं पाकीट पाण्यावर तरंगतंय !!!!


तर आपल्याला कुठे काही सुंदर पाहिलं कि ते घाण केल्याशिवाय राहवत नाही. एक आई वडील प्लास्टिकची पाण्याची बाटली पाण्यात फेकून खिदळत होते. त्यांच्या मुलांवर तर चांगले संस्कार झाले न ?


एक गणित शालेय अभ्यासक्रमात असायला हवं
नागार्जुन सागर ला तीन बोटी प्रत्येकी पाच चकरा करतात. प्रत्येक बोटीवरून प्रत्येक फेरीला दहा बिस्कीटचे पुडे, पाच पाण्याच्या बाटल्या, चार पेप्सीचे कॅन, दहा कुरकुरे सदृश पाकिटे, पाच चॉकलेटचे कागद एवढा कचरा पाण्यात फेकला जातो, तर दिवसाला कोणत्या प्रकारचा किती कचरा पाण्यात फेकला जातो?

सरकार तर्फेच हा व्यवसाय चालतो. मग कोणाला बोलणार?


तरी एका धीट बाईंनी चार टग्या तरुणांना यावरून चांगलाच दम भरला. मी स्वतः जाऊन त्यांचे आभारही मानले आणि ठरवलंय कि शक्यतो हे आपल्या पर्यंत मर्यादित न ठेवता कुणीही कचरा करताना दिसला तर त्यालाही परावृत्त करायचा प्रयत्न करायचा.

त्यासाठी भांडायचीही गरज नाही. गांधीगिरी उत्तम. म्हणजे मी असंही सांगू शकतो कि जर तुम्हाला हा कचरा सांभाळता येत नसेल तर मला द्या, मी सांभाळीन आणि कचरापेटीत टाकीन.
जर शहाणा असेल तर समजून जाईल. निर्लज्ज असेल तर असू दे, मी कचरा वाहीन. शेवटी माझा देश स्वच्छ राहावा म्हणून मी एवढा तर नक्कीच करू शकतो.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.