सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

आटपाट नगर......


नगरशी ज्यांचा चांगला संबंध आलाय किंवा जे नगरमध्ये राहिलेत/राहतायत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी...

loksatta, 07-10-2011 :DigitalEdition


म्हणजे काका, दादा, मामा, भैय्या, किंवा तत्सम लोकांमुळे गांजलेल्या नगरकरांच्या वाहत्या जखमेवर ही एक हळुवार फुंकर... याचा अर्थ जखम भरली असा नाही पण कुठेतरी आशा आहे म्हणायची ....
मी पाहिलं आणि अनुभवलं ते नगर सुंदर, शांत होतं....दादागिरी, मारामारी खून वगैरे प्रकार बातमीत फार क्वचित....
दिल्ली दरवाजा ही त्यावेळी शान होती, ऐतिहासिक वास्तू होती.
आता दिल्ली दरवाजाची वेस घरातल्या खुंटी सारखी झालीय. पाहिजे ते अडकवा. कुठल्या तरी 'महान' नेत्याला मानाचा मुजरा, कुणाला तरी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि काही बाही. त्यावर कुठल्यातरी टग्या लोकांचे फोटो. 
 
लाल टाकीच्या चौकात अप्पू दिमाखात उभा होता, त्याच्या भोवती बाग होती (ती कुठल्या भ्रष्टाचारात खाल्ली गेली कुणास ठाऊक?). शेजारीच आणखी एक बाग आणि कारंजे होते, त्यावर रंगीत रोषणाई होती, नेहरूंचा भाषण देतानाचा पुतळा होता....

लाल टाकी ते अमरधाम असा एक चांगला रस्ता होता अशीही अफवा आहे!!!! त्या रस्त्याला आणखी चांगला बनवण्यास सर्व पक्षांचे राजकारणी पुढे आले आणि श्रेय मिळत नाही हे पाहताच गायबही झाले!!! आता तो रस्ता वाट पाहतोय नशीब उघडायची.    
नेप्ती चौकात सुंदर गोल होता ज्यात बाग होती, मोठमोठी झाडे होती (त्याच्याजागी सुशोभीकरण म्हणून नक्की काय उभं केलाय कुणास ठाऊक आणि त्याची रक्कमही कुणाच्या घशात गेली न ठावे)         
दिल्ली दरवाजा जवळ गरिबांचे गाळे होते, ते जमीनदोस्त केल्यावरच तिथल्या भूखंडाचं श्रीखंड आम्हाला दिसलं... ते कुणाच्या घशात जातंय त्याची वाट पहायची....
तीच गत चितळे रोड वरच्या नेहरू मार्केटची.... काय होणार त्याचं पुढे?

आणि मग अचानक जाणवलं कि टागेगीरीही चांगलीच वाढलीय कुणाकुणाचा वरदहस्त लाभल्यानं. कुणाच्या तरी गाडीला वकिलाचा कि कोणाचा धक्का लागला म्हणून त्या बिचा-याला बेदम चोपला वगैरे.   

आधी कोणी बार्शीकर म्हणून होता... आता तसं कोणी का नाही असं वाटायला लागलंय.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.